आमचा मोर्चा हा फडणवीस साईज होता; महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

२१ डिसेंबर २०२२


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांचे महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये, सीमाप्रश्नी याविरोधात महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला होता. यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका करत मोर्चाला नॅनो मोर्चा म्हंटले होते. याला उध्दव ठाकरे यांनी आज प्रत्युतर दिले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, १७ तारखेच्या मोर्चात सीमाप्रश्न मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या म्हणून आज गप्प बसावे असे नाही. पण, आजही तिथे मराठी नागरिकांवर अत्याचार होत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अद्यापही पत्र लिहून विचारतात काय करु? त्यांनी स्वतः रामराम घेणे गरजेचे होते, असेही त्यांनी म्हंटले आहे. फडणवीस साईज आमचा मोर्चा होता, अस माझ उत्तर आहे. नॅनो मोर्चा संबोधलेल्यांची बुध्दी नॅनो आहे, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *