उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून रडकी सेना ठेवायला हवे – आशिष शेलार
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२
अंधेरी पूर्व मतदार संघाची पोटनिवडणूकीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात हा सामना रंगणार आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शक्तीप्रदर्शनात भाजपाचे अनेक नेते सामील झाले होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
आशिष शेलार म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून रडकी सेना ठेवायला हवे. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावाने रडत होते. आता विरोधी पक्षात असताना न्यायालय, निवडणूक आयोगाच्या नावाने रडत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे तर उद्धव ठाकरेंबरोबर रडकी शिवसेना आहे असा टोला आशिष शेलारांनी लगावला आहे.