मुंबईतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप – रोहित पवार
२२ डिसेंबर २०२२
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चर्चा प्रचंड रंगली. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर आणि ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना आदित्य ठाकरे यांच्यार गंभीर आरोप केले आहेत. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार राहुल शेवाळे कधीच संसदेत बोलत नाहीत. काल बोलून-बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका डोळ्यापुढं ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करूनच असे खोटे आरोप होताहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय.