उद्धव ठाकरे अजूनही सांगतोय सावध व्हा, अन्यथा अवघड आहे ! ठाकरेंना आंबेडकरांनी दिला सल्ला

सत्ताधारी शिवसेना शिंदे गट भाजप युतीला पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडी एकसंध राहील, असा ठाम विश्वास शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार व्यक्त केला जातो. मात्र दुसरीकडे आगामी 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे. तसेच सर्व काही आलबेल आहे अस देखील नाही. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

“भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून होणारी स्वबळाची भाषा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असणारी परिस्थिती, हे लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय घ्यावा व पाऊल ताबडतोब उचला नाही तर नागड गावात फ़िरावंलागेल ” असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील भांडुप मध्ये एका कार्यक्रमा दर्यामान दिला आहे. आण्यात महाविकीसआघाडीत उद्धव ठाकरे यांची अवघड परास्तती होईल असे देखील आंबेडकर ह्या वेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *