मुख्यमंत्र्यांवरचे आरोप गंभीर आहेत – संजय राऊत

२४ डिसेंबर २०२२


दिल्लीत माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करण्यात आलेल्या एनआयटी भूखंड घोटाळ्याच्या भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांवरचे आरोप गंभीर आहेत. केंद्रातल्या अनेक लोकांकडे, केंद्रीय तपास यंत्रणांकडे त्याची कागदपत्र पाठवण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस काल इथे घाईघाईत का आले माहिती नाही. पण नक्कीच इथे त्यांची त्या विषयावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. जे १६ भूखंड झोपडपट्टीधारक आणि गरीबांच्या घरांसाठी राखीव होते, त्यावर काही निष्कर्ष गिलानी कमिटीने काढले होते. भूखंड वाटपाला विरोध केला होता. तरीही त्यावेळच्या नगरविकास मंत्र्यांनी त्याचं वाटप घाईघाईने केलं होतं असं संजय राऊत म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *