माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते; दसरा मेळाव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला शिवसेनेच्या दोंन्ही गटाचा दसरा मेळावा अखेर पार पडला आहे.शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी जोरदार टीका, टिप्पणी पाहायला मिळाली. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे शिंदे गटाला टोला लगावल्याचे आहे.

कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही,माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं.

याचबरोबर, मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते ,जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली. असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *