देशात दोन राष्ट्रपिता,महात्मा गांधी हे जुन्या तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता – अमृता फडणवीस
२१ डिसेंबर २०२२
अमृता फडणवीस या नागपूर येथे अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात कार्यक्रमात उपस्थित होत्या. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फडणवीस म्हणाल्या, आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता असून महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या, मी स्वतःहून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते.
राजकीय वक्तव्य जास्त करीत नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केले नाही. जे २४ तास राजकारणासाठी देतात आणि राजकारणात जे लायक आहेत त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. देवेंद्रजी २४ तास समाजासाठी झटत असतात. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मला सध्या राजकारणात यायचे नसल्याचे अमृता यांनी स्पष्ट केले.
याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हंटले होते. त्यावर कमेंट्स करत नेटीझन्सनी फडणवीस यांना मोठ्या प्रमाणमात ट्रोल केले होते.