आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत म्हणणाऱ्यांनी सरपंच आणि सदस्यांची यादी जाहीर करावी – संजय राऊत
२१ डिसेंबर २०२२
राज्यात निवडणूक लागलेल्या ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीपैकी भाजपनं एकूण २ हजार २३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं १ हजार २१५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलंय. शिंदे गटानं ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. या निकालावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाष्य केलंय.
एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबर वर आहोत .असे म्हणणाऱ्या मंडळी नी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्राम पंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं? अशी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.