बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का; रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर

१९ डिसेंबर २०२२


भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पुढील सामना २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याची बातमी समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही.

रोहित शर्मा फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे परंतु क्षेत्ररक्षणाबाबत थोडा चिंतेत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आता जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करताना दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *