मोर्चा वसुली बंद झाली,सत्ता गेली यासाठी; महाविकास आघाडीच्या महामोर्च्यावर भाजपची टीका

१६ डिसेंबर २०२२


महापुरुषांचा वारंवार होणाऱ्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याला पोलिसांनी आता परवानगी दिली आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. मात्र, याच मोर्चावरून भाजपने महाविकास आघाडीला डिवचले आहे. ट्विट शेअर करत भाजपने महाविकास आघाडीला काही सवाल केले आहे.

मोर्चा कशासाठी ?
वसुली बंद झाली यासाठी ,सत्ता गेली यासाठी
मोर्चा नवाब मलिक अजून आत आहे या साठी
मोर्चा अफजल खानची कबरचा भाग हटवला यासाठी
मोर्चा मविआपेक्षा जास्त गुंतवणूक आणली यासाठी
मोर्चा विकास काम करतायत यासाठी
मोर्चा जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केलीत यासाठी


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *