आसीसीसीनं टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची केली घोषणा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं (ICC) टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केलीय. या संघातवर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली ,सूर्यकुमार यादवला समावेश करण्यात आलाय. तर, भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची १२ वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय.आयसीसीच्या ICC Men’s T20 World Cup 2022 Most Valuable Team संघात एकूण सहा देशांचे विविध खेळाडू आहेत.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आलीय. यानंतर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवपासून मधल्या फळीला सुरुवात होत आहे.यानंतर पाचव्या क्रमांकावर या टी-20 विश्वचषकात शतक झळकावणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा ऑलराऊंडर खेळाडू सिकंदर रझा सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादबा खानची सातव्या क्रमांकावर निवड झाली.या संघात इंग्लंडचा ऑलराऊंडर आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ सॅम करन आठव्या क्रमांकावर आहे. यानंतर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खिया नवव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दहाव्या क्रमांकावर आहे. तर, शाहीन आफ्रिदीला अकराव्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. आणि हार्दिक पांड्याची १२ वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *