फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं दिवस बदलत असतात,आजचा आणि उद्याचा दिवस यात फरक असू शकतो – उद्धव ठाकरे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२
शिवसेना खासदार संजय राऊत यांना १०० हून अधिक दिवसांनी जामीन मिळाला. ते तुरुंगाबाहेर आल्यानंतर ठाकरे गटात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट करत कोणीही असो, कोणालाही सोडणार नाही, असं म्हटलं. याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंसमोर राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. ते गुरुवारी (१० नोव्हेंबर) मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोणालाही सोडणार नाही यात देवेंद्र फडणवीसही आले. फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं. दिवस बदलत असतात. आजचा आणि उद्याचा दिवस यात फरक असू शकतो. त्यांच्या ट्वीटचा अर्थ हाच आहे की त्यात तेही आहेत किंवा असतील. आता स्पष्ट झालं आहे. न्यायालयाने जो निकाल दिला त्या न्याय देवतेचे मी आभार मानतो. या निकालपत्रात अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरिक्षणं त्यांनी नोंदवली आहेत. त्यामुळे हे जगजाहीर झालंय की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत