अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार दिला असता, तरी भाजपचा पराभवच झाला असता – जयंत पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यश्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून याबाबात घोषणा केली आहे. भाजपाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, राज्यात गेले काही दिवस राजकीय नाट्य सुरू होते. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने न्यायालयात जाणे, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करणे, हे अत्यंत क्लेशदायक होते. शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपाला उशीरा सुचलेले शहाणपण आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार दिला असता, तरी भाजपचा पराभवच झाला असता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *