माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली

रायगड प्रतिनीधी

माळीण सारखी एक मोठी दुर्घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर मधील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे.सदर घटनेत पन्नास ते साठ लोक ढिगा-या खाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून वीस ते पंचवीस जणांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRF ला यश आले आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे.
सदर घटनाही ही काल रात्री 9 ते 10 च्या सुमारास घडल्याची माहीती समोर येत असून घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत करण्यात येणार असून जखमींचा सर्व खर्च सरकार करणार असे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मदत कार्य ही सुरू असले तरी सुरू असलेला पाऊस आणि आति दुर्गम भागात ही घटना घडली असल्याने जे.सी.बी पोकलाॅड हे घटनास्थळी पोहचूशकत नाही नसल्याने मदतकार्यात अडचण येत आहे.खराब हवामान मुळे हेलीकॉप्टर ही घटनास्थळी पोहचू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *