देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांना इशारा

१८ नोव्हेंबर २०२२


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर वक्तव्य केलं. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वीदेखील ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. मला असं वाटतं, मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधानं केली जात असावीत. सुरुवातीला मीडियाचं विशेष लक्ष नव्हतं. माध्यमात चर्चा व्हावी, यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठिक आहे. पण, कायद्याच्या चौकटीबाहेर काही केलं तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल.

राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे. आम्ही सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू. पण, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा इशारा फडणवीस यांनी दिला. दरवेळी राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते हे ते गेल्यावर काहीतरी एखादं वाक्य बोलतात. बाकी सत्तेकरिता त्यांच्यासोबत आहे. हे सावरकरांकरिता सत्ता कधीच सोडू शकत नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *