IND vs ENG सेमीफायनल : टॉस जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


टी 20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला असून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आता फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरला आहे. आज भारताकडे पहिली फलंदाजी असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

कसा आहे इंग्लंडचा संघ?

अॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *