यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाने अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचलं

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ नोव्हेंबर २०२२


गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पातील पाणी अखेर तब्बल 15 वर्षांनी शेतकऱ्यांच्या शेत शिवारात पोहोचलं. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या सुमारे 22 गावातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. “अमृतासारखं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलं, आज सोन्यासारखा दिवस आहे. वडील भैय्यासाहेब ठाकूर यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. गेल्या दहा वर्षापासूनच्या संघर्षाला यश मिळालं. अखेर झोपलेला जलसंपदा विभाग जागा झाला आणि माझा बळीराजा सुखावला,” असं मत माजीमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *