राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असताना तेव्हाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता असे विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

केसरकर म्हणाले, आम्ही आमच्यावरील अन्याय झाल्याची भूमिका मांडत आलो आहोत. वास्तव लोकांना सांगितल्याने राज्यानेही त्यावर विश्वास ठेवला म्हणूनच दंगली झाल्या नाहीत. पक्षातून बाहेर पडत असताना अनेक आरोप केले. त्यात पक्षात नसणारेही काहीही बोलत राहिले. खोट्या गोष्टींचे भांडवल केले गेले. राज्यात घडलेल्या चुकीच्या गोष्टींना ही मंडळी जबाबदारी असताना त्याची आमच्यावर जबाबदारी ढकलली जात असल्याने वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजावी यासाठी भूमिका मांडली जाणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *