शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मानांना बसला आहे; ठाकरे गटाकडून टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली.

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मानांना बसला आहे. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहेत. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *