अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ; आशिष शेलारांच ठाकरे गटाला प्रत्युत्तर
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मानांना बसला आहे. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहेत. अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले! अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी टीकेला प्रत्त्युतर दिले आहे.
सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला "गणपत वाणी" आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच…
सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले!
“अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!”
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 18, 2022