50 कोटी कोणत्या गाडीत आणले ते दाखवा; गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटातील नेत्यांना सवाल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


सिल्लोडमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिल आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले,आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही 50 कोटी घेतले. पश्चिम बंगालला एक रेड पडली. 27 कोटी आणायला टेम्पो लागली. 50 कोटी कोणत्या गाडीत आणले. ते तर दाखवा, असा प्रश्न त्यांनी विचारला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *