अंधेरी पोटनिवडणुकीत आम्हाला निवडून यायची पूर्ण गॅरंटी होती – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली नसती तर आमच्या उमेदवाराचा नक्की विजय झाला असता. पण राज्याची राजकीय संस्कृती आहे. दिवंगत नेत्याच्या जागी त्याच्या परिवारातील कुणी उभे राहत असेल तर अशा जागांवर शक्यतो उमेदवार न देण्याची परंपरा आहे. आर आर पाटील, पतंगराव कदम गेले त्यावेळी भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. आताही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विनंतीवरुन भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत होतं निवडणूक लढवली पाहिजे. निवडून येण्याची आम्हाला पूर्ण गॅरंटी होती. पण यादरम्यान राज ठाकरे, शरद पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली. काही जणांनी पडद्याआडून आम्हाला विनंती केली, त्यावर आम्ही विचार केला. त्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो. आर आर पाटील, पतंगराव कदम गेले, त्यावेळी भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. कधीकधी कार्यकर्त्यांची नाराजी पत्करुन असे निर्णय घ्यावे लागतात, आम्ही निर्णय घेतला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *