T20 क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली ठरला पहिला भारतीय फलंदाज
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑक्टोबर २०२२
भारताचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहलीने फॉर्मात परतल्यानंतर विक्रमावर विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. गुवाहाटी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीनं ताबडतोड ४९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं मोठ्या विक्रमाला गणवसणी घातली आहे. विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
गुवाहाटीमध्ये फलंदाजी करत विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार करत ११ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच तर जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं ३५४ टी २० सामन्यात ११ हजार धावांचा पल्ला टप्पा पार केला आहे.