टीम इंडियाला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्ड कप मधून बाहेर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ सप्टेंबर २०२२


ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात १६ तारखेपासून आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होत आहे. ही स्पर्धा तोंडावर आली असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

जसप्रीत बुमराला पाठीच्या दुखापतीमुळे सहा महिने बाहेर राहावे लागेल. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२० सामने खेळले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी तो तिरुअनंतपुरमला गेला नाही. रवींद्र जडेजानंतर टी-२० विश्वचषकाला मुकणारा बुमराह हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र तो चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर असणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *