भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याला सुरुवात; भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 187 धावांचे लक्ष्य
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन येथे वॉर्मअप मॅच सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिली बॅटिंग दिली. टीम इंडियाने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्येच 69 धावा फटकावल्या होत्या. केएल राहुलने टीम इंडियाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. केएल राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांचा संघर्ष सुरु होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळेच टीम इंडियाने 180 धावांचा टप्पा ओलांडला.
भारताने टी 20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सराव सामन्यात 20 षटकात 7 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली. भारताने पहिल्या 10 षटकात जवळपास 10 च्या सरासरीने धावा केल्या. मात्र ठराविक अंतराने भारताच्या विकेट्स पडल्याने भारताला 200 चा टप्पा पार करता आला नाही.