नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार तर तीन जखमी

इनोव्हा व पिकपचा गाडीचा अक्षरशः चक्काचूर


 

नगर कल्याण महामार्गावरील वाटखळे(ता. जुन्नर )गावच्या हद्दीत इनोव्हा कार (एम एच ०५ ए एस ६३३७) ही ओतूरच्या दिशेने जाताना व पीकअप (एम एच १४ जी डी ४०७४) ही कल्याणच्या दिशेने जाताना या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची खात्रीशीर प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हा अपघात ता.३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला असून सदरचा अपघात इतका भीषण होता की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे निदर्शनास येत आहे,तसेच दोन्हीही वहाने अतिशय वेगात असल्याचे या अपघाताचे मुख्य कारण आहे असे स्थानिक प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
या अपघातात राहुल प्रभाकर मुळे रा. मांजरवाडी (ता. जुन्नर ), निखिल रोहिदास राऊत रा. खेड आणी विकी सदाशिव त्रीपाठी रा. घाटकोपर हे तीन मृत्यू पावले आहेत तर योगेश शिवाजी हाडवळे रा. राजुरी (ता. जुन्नर ), शैलेश नन्हे सिंग रा. घाटकोपर हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर प्रिन्स नन्हे तिवारी याला किरकोळ दुखापत झाली आहे.स्थानिक नागरिक व ओतूर पोलिसांची टीम मदत कार्यासाठी तत्परतेने घटना स्थळी हजर झाली होती. रस्ता चांगला असल्यामुळे वाहने वेगाने सुसाट या महामार्गांवरून धावत असताना चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *