शिंदेंच्या मनात उठावाचं बीज मीच पेरलं, विजय शिवतारेंच्या विधानावर संजय राऊतांची टीका
२६ डिसेंबर २०२२
एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले होते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे साडेचार तास बसलो होतो, असा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यावरच आता शिवसेना ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्व गोष्टी पैशांने विकत घेता येत नाहीत. समोर बसलेले श्रोते शिवसेनेचे धन आहे. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. आपण बंडखोरी केली पाहिजे याचे बीज मीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात भरवले, असे एक माजी मंत्री म्हणाला. अरे तुझं नशीब फुटलं आहे. तू फुटला नाहीस. भविष्यात तुम्हाला कळेल. असा इशारा राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत जे बोलतो ते घडंत. मला भविष्यात काय घडणार याची माहिती आहे. महाभारतात जसा एक संजय होता, अगदी तसाच एक संजय शिवसेनेत आहे. हा संजय कायम कुरुक्षेत्रावरच असतो. लढत असतो, असेही राऊत यावेळी म्हणाले.