दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल – नितेश राणे

२२ डिसेंबर २०२२


सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांचे मृत्यू झाले, तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांचे नावांची चर्चा का होत नाही हे समजण्याची गरज असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने ४४ फोन का केले होते याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे, कोणता मंत्री दोषी आहे समोर आलंच पाहिजे, अशा घोषणांनी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा दणाणून सोडली. दिशाच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार? असा सवाल शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आक्रमक होऊन नितेश राणे यांनी कुणाच्या दबावापोटी याप्रकरणाचा तपास थांबला आहे? असा सवाल करुन या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करावी, अशी मागणी केली.यावरुन सभागृहात जोरदार गोंधळ झाला. याप्रकरणात अध्यक्षांना पुन्हा-पुन्हा विधानसभा काही काळासाठी तहकूब करावी लागली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *