हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाचे वॉरंट जारी
०१ डिसेंबर २०२२
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा प्रकरणानंतर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खार ठाण्यात गुन्हा आणि अटकेनंतर राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका झाली. राणा दाम्पत्याला ११ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. हे वॉरंट जामीनपात्र आहे. ५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका होईल. मात्र इथून पुढच्या सुनावणींसाठी राणा दाम्पत्याला हजर राहावं लागणार आहे.