मनसेची भूमिका सरड्यासारखी रंग बदलणारी आहे – किशोरी पेडणेकर
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२
मशिदीवरील ‘भोंगे’ हटवा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाष्य केलं होतं. तर, औरंगाबादमध्ये ४ मे ला झालेल्या सभेत मशिदीवर ‘भोंगे’ हटवावे अन्यथा, हनुमान चालीस लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यात आता मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘भोंगे’ लावले आहेत. यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर टीका केली आहे.
मनसेची भूमिका सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. भोंगे वाजवले, पुन्ह बंद केलं, लोकांना किती गृहित धरणार. किती खोटे बोलायचं. त्यांच्या पक्षाचे नाव वेगळं आणि प्रत्यक्षात कृती वेगळी आहे. लोकांच्या मनात आपल्या पक्षाविषयी काय प्रतिमा तयार होते, याचा सुद्धा विचार करावा,” असा सल्लाही पेडणेकर यांनी मनसेला दिला आहे.