भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात विजय
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२
भारतीय क्रिकेट संघाचे पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झाला. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला अखेरच्या षटकात 11 धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या दोन चेंडूत दो धावा दिल्यानंतर मोहम्मद शामीच्या अखेरच्या चार चेंडूत ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले.