उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे; नितेश राणेंची टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण होत आहे. तसेच भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा वादही सुरू आहे. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका होत आहे. यात आता आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेकडून स्वीकारला जात नसल्यामुळे या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरेंन केल्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे काय करतात, याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यावर जास्त कशाला बोलायच, अस निराश राणे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *