गद्दारी ही एकनाथ शिंदे यांनी नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी केली आहे – रामदास आठवले

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२


शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांवर ते गद्दार आहे, तसेच ५० खोके एकदम ओके म्हणत टीका केली जात आहे. टीका करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्यांचं डोक ठिकाणावर नाही, ज्यांच डोकं फिरलय, तेच ५० खोके एकदम ओके, असे वक्तव्य करत असल्याचे मंत्री आठवले म्हणाले.

शिंदे गटातील आमदार हे गद्दार नाहीत. ते गद्दार असते तर त्याच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता नसती. केवळ आमदार, खासदार शिंदे यांच्यासोबत नाही तर संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे शिंदे यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या सभांवरून लक्षात येते, असेही रामदास आठवले म्हणाले.

आता दसरा मेळावा होत आहे, यात शिंदे व उद्धव ठाकरे, असा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर चोख उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देतील. गद्दारी ही एकनाथ शिंदे यांनी नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश सदस्य संख्येचे बहुमत आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनाच मिळायला हवे, अशी आमची मागणी आहे. पण याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. असे रामदास आठवले म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *