माळशेज घाटपायथा ते घाटमाथा बोगदा व्हावा- जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार
रामदास सांगळे
विभागीय संपादक
३० डिसेंबर २०२१
बेल्हे
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी
कल्याण- नगर महामार्गावरील माळशेज घाटात घाटमाथा ते घाटपायथा असा बोगदा करण्याची मागणी जिल्हा परिषद पांडुरंग पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि लोहमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की मुंबई- कल्याण- अहमदनगर-नांदेड- विशाखापटनम हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जुन्नर तालुक्यातुन जातो. घाट रस्त्यासाठी येथे घाटपायथा ते घाटमाथा असा बोगदा झाला तर प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच पेट्रोल-डिझेलची सुद्धा बचत होईल.या घाटात वारंवार होणारे अपघात देखील कमी होतील.त्यामुळे हा बोगदा व्हावा अशी विनंती पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.