स्मार्ट सिटी सायबर हल्ल्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सीआयडी मार्फत चौकशी करा.- भापकरांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व नगर विकास मंत्र्यांना पत्र.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि ४ एप्रिल २०२१
स्मार्ट सिटी प्रकल्पातील २७ सर्व्हरमधील डेटा चोरी झाल्याने पिंपरी – चिंचवडकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. नागरिकांचा डेटा चोरट्यांच्या हाती लागल्याने त्याचे गंभीर परिणाम व्यक्ती आणि व्यवसायिकांना भोगावे लागणार आहेत. १५ कोटी खर्चुनही उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्याकामी ’टेक महिंद्रा कंपनी’ अपयशी ठरली आहे. सायबर हल्ल्याला बारा दिवस झाल्यावर महापालिका यंत्रणा जागी झाल्याने शंका बळाविल्या आहेत. ५२५ कोटी रुपयांच्या कंत्राटात महापालिका कोणाचे ’लाड’ पुरवितेय असा सवाल निर्माण झाला आहे. या प्रकाराला ‘टेक महिंद्रा कंपनी’ सर्वस्वी कारणीभूतआहे. विविध कंपन्यांशी संगनमत करणारे स्मार्ट सिटीचे जॉर्इंट सीईओ नीळकंठ पोमण यांचा अकार्यक्षमपणा उघड झाला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी.
स्मार्ट सिटी अंतर्गत टेक महिंद्रा या कंपनीला काम देण्यात आले आहे. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर अज्ञात व्यक्तीद्वारे रॅन्समवेअर हल्ला झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी यांनी पोलिसांकडे केली आहे. याच तक्रारीत कंपनीने वस्तुस्थिती दडविण्याचा प्रयत्न केला आहे. विसंगत आणि दिशाभूल करणारी माहिती कंपनीने पोलिसांना दिली आहे. कंपनी एकिकडे म्हणते की, रॅन्समवेअर हल्ल्यात चीन, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी या देशातून कोणी अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे कंपनी मान्य करते की, अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमध्ये प्रवेश करुन महत्वाचा डेटा इन्क्रिप्ट केला असून महत्वाचा डेटा डिक्रीप्ट करण्याकरीता बिटकॉईन द्वारे पैशाची मागणी करत आहेत. एकिकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला म्हणतात आणि दुसरीकडे प्रवेश करुन डेटा चोरला म्हणतात, हे संशयास्पद आहे. रॅन्समवेअर हल्ल्यात अंदाजे ५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने स्मार्ट सिटी बाबतची कोणतीही महत्वाची माहिती ’लिक’ झालेली नाही असा विचित्र दावा केला आहे. हा प्रकार स्वतःवरची जबाबदारी झटकणारा आहे.
महापालिकेने जे कंत्राट टेक महिंद्रा कंपनीला दिले आहे त्यासाठी सुमारे ५२५ कोटी रुपयांचा करारनामा केला आहे. ’फायर वॉल’साठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीला देण्याची खास तरतूद आहे. कुठलिही जोखीम न घेता सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यासाठीच महापालिकेने मोठी रक्कम या कंत्राटासाठी मोजली आहे. सायबर हल्ला झाला किंवा डेटा चोरी झाला असेल अथवा कुठलेही नुकसान झाले असेल तर ती सर्व जबाबदारी टेक महिंद्रा कंपनीचीच आहे. मूळच्या कंत्राट करारा मध्ये फॉर्टीनेट कंपनीच्या फायरवॉल असतील असे मान्य केले होते. प्रत्यक्षात सप्टेंबर २०१९ मध्ये सिस्को फायर पॉवर या कंपनीच्या फायरवॉलसाठी टेक महिंद्रा कंपनीने महापालिकेकडे परवनागी मागितली होती. महापालिकेने परवानगी नाकारली असली तरी टेक महिंद्रा कंपनीने परस्पर काही बदल केले आहेत का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. एक ’पोर्ट ओपन’ राहिला असावा, अशी शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. तथापि, सोल्युशन आर्कीटेक्ट, स्काडा एक्सपर्ट आणि आयओटी एक्सपर्ट अशा उच्च तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याची ग्वाही टेक महिंद्रा कंपनीने मूळ करारात दिली होती. प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचे आणि अपेक्षेपेक्षा कमी मनुष्यबळ नियुक्त केल्याने ही वेळ आली आहे. प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करणे क्रमप्राप्त असताना कोरोना काळात ’वकं प्रगो़म होम’ केल्याने सुरक्षेत हलगर्जिपणा झाला आहे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५ ला सायबर हल्ला होतो आणि गुन्हा १२ दिवसांनी म्हणजे ९ मार्च रोजी दाखल होतो, हेदेखील संशयास्पद आहे. या घटनेला आणि नुकसानीला टेक महिंद्रा कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. या प्रकारामुळे महापालिकेची नाचक्की झाली आहे. आगामी काळात आणखी नुकसान होऊ नये यासाठी तत्काळ काही कठोर निर्णय होणे गरजेचे आहे. तसेच पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीचे ४४० कोटी रुपयांचे वंâत्राट घेणारया कंपनीत ५० टक्के हिस्सा क्रिस्टल इंटिग्रेटीड सव्र्हीस प्रायव्हेट लिमिटेड यांचा असून टेक महिंद्रा कंपनीचा केवळ १२ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे सायबर हल्ला आणि त्याची पूर्ण जबाबदारी क्रिस्टल इंटिग्रेटीड कंपनीची की टेक महिंद्रा कंपनीची या विषयी गूढ निर्माण झाले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांच्या रितसर निविदा मागवून कंत्राट देण्यात आले होते. त्यात टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटीड सव्र्हीस आणि आर्सेस इन्फोटेक या भागीदार कंपन्यांना काम दिले. त्यातील टेक महिंद्रा ही कंपनी नामांकीत तसेच उच्च तंत्रज्ञानात खूप अद्ययावत असल्याने त्यांचे काम पाहून कंत्राट निश्चित करण्यात आले. भागीदार कंपनीत लीड पार्टनर टेक महिंद्रा असूनही एकूण ४४० कोटी कामापैकी अवघे ५० कोटी रुपयांचे म्हणजेच १२ टक्के काम टेक महिंद्रा कंपनीकडे आहे. क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस कंपनीकडे ५० टक्के म्हणजेच २२० कोटी रुपये आणि आर्सेस इन्फोटेक कंपनीकडे १७५ कोटीचे (३८ टक्के) काम आहे. सर्वात कमी जबाबदारी टेक महिंद्रा कंपनीकडे असताना केवळ मुख्य भागीदार म्हणून सायबर हल्ल्याबाबतची फिर्याद त्यांनी दाखल केली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे.
क्रिस्टल कंपनीकडे प्रकल्पाचे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, मॅनपॉवर रिसोर्स, टेक्निकल डायरेक्शन, पूर्ण आढावा तसेच व्हेंडर को-ऑर्डिनेशन अशी सर्व महत्वाची जबबाबदारी आहे. याचाच अर्थ सायबर हल्ला झाला त्याबाबत पुरेशी खबरदारी घेण्याची जबाबदारीसुद्धा क्रिस्टल कंपनीकडेच होती. प्रत्यक्षात २६ फेब्रुवारी रोजी सायबर हल्ला झाला, पण तत्पूर्वी महिनाभरापासून हल्लेखोरांनी सिस्टममध्ये डोकावणे सुरू केले होते. अशाही परिस्थितीत क्रिस्टल कंपनीकडे जबाबदारी असताना त्यांना हे समजले कसे नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्मार्ट सिटीचे काम या भागीदार कंपन्यांना देताना टेक महिंद्राची पात्रता उच्च दर्जाची असल्यानेच काम देण्यात आले. मुख्य भागिदाराला किमान ५१ टक्के काम असायला हवे होते. प्रत्यक्षात भागीदारीत टेक महिंद्रा कंपनीचा हिस्सा अवघा १२ टक्के असताना त्याबाबत स्मार्ट सिटीच्या सल्लागारांनी आणि महापालिका अधिकाकरयांनी संचालक मंडळाने कानाडोळा केला.त्यामुळे या गंभीर प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी)मार्फत चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी असे भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *