राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत करावी-वसंत मुंडे

सरकारने घोषणेला जागुन निर्णय घ्यावा.

बातमी -दत्ता गाडगे विभागीय संपादक पारनेर :-

कोरोनामुळे मृत्यू झालेले टिव्ही 9 वृत्त वाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर (पुणे) यांच्यासह संतोष भोसले (गेवराई, जिल्हा बीड), गंगाधर सोमवंशी (लातूर), जयप्रकाश डिगराळे (नंदुरबार) या मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने घोषणा केल्याप्रमाणे 50 लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात करोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाला तर त्यांनाही आरोग्य व पोलिस कर्मचार्‍यांप्रमाणे पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत पत्रकारांच्या कुटुंबियांनाही मदत केली जाईल अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दि. 3 जून रोजी केली. मात्र तीन महिने लोटले तरी सरकारी आदेश काढला नाही. पुण्यात टीव्ही9 वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आणि योग्य उपचार न मिळाल्याने मृत्युला सामोरे जावे लागले.

रायकर हे वृत्तवाहिनीचे पत्रकार असल्याने दोन दिवसां पासून राज्यस्तरावरील प्रसार माध्यमांसह विविध पक्ष संघटनांनी या घटनेवरुन सरकारला धारेवर धरले. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. विविध राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या. परंतु अशा घोषणांचे आणि सरकारी चौकश्यांचे काय होते? ही बाब सर्वश्रृत आहे. त्यामुळे पक्ष आणि संघटनांच्या मदतीपेक्षा सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मदत करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावरील माध्यमांनी आवाज उठवावा.

मागील दोन महिन्यात कोरोनामुळे गेवराई (जि.बीड) येथील सामनाचे पत्रकार संतोष भोसले यांचा सरकारी रुग्णालयातील कोव्हीड कक्षात 28 जुलै रोजी मृत्यू झाला. तर लातुर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचाही 29 जुलै रोजी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवंशी यांना तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी 75 हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आ