आदिवासी विचारमचं महाराष्ट्रराज्य व बिरसा ब्रिगेड शाखा आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात गावभेट दौरा…
भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्टयातील फुलवडे ते आहुपे आदिवासी भागाचा गावभेट दौरा आदिवासी विचारमचं महाराष्ट्रराज्य व बिरसा ब्रिगेड शाखा आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला, पश्चिम आदिवासी भागाचा गावभेट दौरा करुन येथील आदिवासी बांधवांच्या समस्या तसेच त्याठिकाणी ये -जा करण्यासाठी रस्ता नाही, प्यायला पाणी नाही,आमचं गाव देखिल धोकादायक गावांच्या यादीमध्ये नाही, आम्ही पण जीव मुठीत घालुन राहतोय असे येथील ग्रामस्थ यांनी सांगितले.
hफुलवडे या ठिकाणी गेले ८ दिवसा पासून लाईट नसल्याची येथील स्थानिक ग्रामस्थ तक्रार करत आहे. या ठिकाणी प्रत्येक गावागावात जागतिक आदिवासी दिन हा कोरोनाचे नियम पालन करत तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करत साजरे करण्यात यावे. या वेळी बोरघर येथील कातकरी -आदिवासी बांधवांच्या समस्या विचारात घेवून फुलवडे ,पंचाळे ,बोरघर माळीण ,कोंढरे ,आडिवरे तिरपाड ,पिंपरगणे ,ढोण आहुपे या गावांचा दौरा करण्यात आला.
या वेळी माळीण गावात १५१ आदिवासी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले ,बिरसा ब्रिगेड शाखा आंबेगावचे अध्यक्ष आदिनाथ हिले, लोकमतचे पत्रकार कांताराम भवारी ,शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे ,नटवरलाल गवारी ,आहुपे सरपंच रमेश लोहकरे ,कार्याध्यक्ष प्रवीण पारधी ,प्रदिप पारधी, गोविंद केंगले ,बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी अध्यक्ष सुनिल गिरंगे, विकास पोटे ,उपाध्यक्ष युवानेते मारुती दादा केंगले कृष्णा केंगले उमाताई मते आनंद मोहरे ,राजेश डामसे विनायक लोहकरे ,दिनेश माळी आदी सह प्रत्येक गावातील कमिटीचे पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते