भ्रष्टाचाराचे आरोप केवळ शिंदे गटाच्याच मंत्र्यांवरच का होत आहेत हा विचार शिंदे गटातील मंत्र्यांनीच केला पाहिजे – उद्धव ठाकरे

२९ डिसेंबर २०२२

नागपूर


नागपूर हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे-फडणवीस सरकारची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं .विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ते सर्व शिंदे गटातील आहेत. यावर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व भ्रष्टाचाराचे आरोप केवळ शिंदे गटाच्याच मंत्र्यांवरच का होत आहेत हा विचार शिंदे गटातील मंत्र्यांनीच केला पाहिजे. ही प्रकरणं नेमकी कोठून बाहेर येत आहेत आणि कशी बाहेर येत आहेत यावर शिंदे गटाने विचार करावा. हा शोध त्यांनीच घ्यावा. ही भ्रष्टाचाराची प्रकरणं माझ्या सरकारच्या काळात झाले. मात्र, याचा अर्थ माझा त्याला पाठिंबा होता, असं नाही. जेव्हा आरोप झाले तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. तो मंत्री तेव्हा माझ्या शिवसेनेबरोबर होता. आता कुठे आहेत माहिती नाही. आताही त्यांचं प्रकरण बाहेर आलं आहे. आता एकएक प्रकरण बाहेर येत आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाने भाजपा आधार देतेय की गाडत आहे हा विचार करावा, असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *