म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले – सुषमा अंधारे
२८ डिसेंबर २०२२
उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसं गेलं? या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. त्या सोलापूरमधील महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.
अजित पवार, अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केले नसते म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत.म्हणजे महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटाकडे दिली. शिंदेंना बदनाम करण्याचे हे फडणवीस यांचे षडयंत्र आहे. फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.