देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी! इतर कुणाची ती पात्रता नाही; नाना पटोले यांचं अमृता फडणवीसांना उत्तर
२१ डिसेंबर २०२२
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता असून महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले .यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी! इतर कुणाची ती पात्रता नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी वल्गना बोम्मई खुलेआम करतात. शिंदे- फडणवीस मात्र अळीमिळी गुपचिळी! डरपोक ईडी सरकार, अशी टीकाही शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.