काही लोक संपादक आहे की पादक हे बघावं लागेल; आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका

०८ डिसेंबर २०२२


गुजरात निकालावरून संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केला होता. गुजरातचा निकाल अपेक्षितच आहे. तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर नक्कीच अटीतटीची लढाई झाली असती. पण, बहुधा दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं साटंलोटं आप आणि भाजपात झालं असावं, अशी लोकांना शंका आहे,असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या विधानावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.हिमाचलचा संपूर्ण निकाल अजून हाती यायचा आहे. गुजरातमध्ये सातव्यांदा बहुमत घेऊन सरकार स्थापन होईल, असं दिसत आहे. हा विक्रम आहे. जेव्हा हा विक्रम होतो. तेव्हा काही लोकांच्या पोटात मुरडा येतोच आणि त्याचा आवाज आपण बघत आहोत,असा टोला शेलार यांनी विरोधकांना लावला आहे.

संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना शेलार म्हणाले, काही लोक संपादक आहे की पादक हे बघावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी वायूप्रदुषणाचे काम म्हणजे संजय राऊत यांची पत्रकार परिषद.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *