धमकीचे फोन आले हे सांगायला राऊतांना चाेवीस तास का लागले? शंभूराज देसाईंचा सवाल

०८ डिसेंबर २०२२


गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विराेधी नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक हल्ले हाेऊ लागले आहेत. शंभूराज देसाईंनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबाेल करीत तुम्हांला धमकीचे फाेन आले हे सांगण्यास चाेवीस तास का लागले असा सवाल राऊतांना केला आहे.

गुजरात निवडणुकीच्या निकालास प्रारंभ झाला आहे. त्यावर बाेलताना देसाई म्हणाले कितीही कुणी यात्रा काढल्या, कुणाच्या पाठीमागे राहायचं प्रयत्न केला, कुणाच्या हातात हात घालून चालला तरी काही फरक पडत नाही हे आजच्या निकालानंतर स्पष्ट हाेईल. संजय राऊत यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी. त्यांच्यात काेणत्याही प्रकारचे धाडस नाही हे यापुर्वीच सर्व महाराष्ट्राने पाहिली आहे. आता चाेवीस तासानंतर राऊत म्हणतात मला धमकीचे फोन आले. त्यांना माध्यमांच्या समोर येऊन सांगायला चाेवीस तास का लागले, असा सवाल देसाईंनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *