हिंदुत्त्व सोडल्यानंतर ठाकरे गटाला आता मदतीची गरज आहे – दीपक केसरकर

०५ डिसेंबर २०२२


वंचित बहूजन आघाडी आणि ठाकरे गटात युती होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर दीपक केसरकर यांनी हिंदुत्त्व सोडल्यानंतर ठाकरे गटाला आता मदतीची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दीपक केसरकर म्हणाले, जे लोकं एखादे बॅनरसुद्धा महापरिनिर्वाण दिनाला लावत नव्हते. त्यांना आता वंचित बहूजन आघाडी बरोबर युती करावी लागते आहे. ही एक चांगली बाब आहे. हिंदुत्त्व सोडल्यानंतर ठाकरे गटाला आता मदतीची गरज आहे. काँग्रसे-राष्ट्रवादी बरोबर यापूर्वीच आघाडी झाली आहे, त्यामुळे आता वंचित बरोबर युती झाली तरी त्यात काही नवल नाही. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेबरोबर जावं का? हा विचार त्यांनी करायला हवा, प्रकाश आंबेडकर याबाबत योग्य तो निर्यय घेतील. शेवटी त्यांना बाबासाहेबांचा वारसा आहे. मतं कुठ मिळतात यापेक्षा हा वारसा महत्त्वाचा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *