ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढणार

११ नोव्हेंबर २०२२

पुणे


पीएमपीने ग्रामीण भागात सुरू असलेले 40 मार्ग बंद करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी प्रशासन पहिल्या टप्प्यात 18 ग्रामीण भागातील मार्गांवर एसटीच्या गाड्यांच्या फेऱ्या तत्काळ वाढवणार आहे. संपकाळात एसटीची सेवा बंद होती, याचा फायदा घेत पीएमपी प्रशासनाने सर्रासपणे ग्रामीण भागात एसटीची परवानगी न घेताच आपली सेवा सुरू केली. संप संपला, एसटीची सेवा पूर्ववत झाली, परंतु पीएमपीने काही ग्रामीण भागातील मार्ग बंद केले नाहीत

. आता पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पुणेकरांना कमी पडत असलेल्या गाड्यांची संख्या लक्षात घेता, ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पीएमपी ग्रामीण भागातील 40 मार्ग आता बंद करणार आहे. मात्र, ग्रामीण भागात 104 मार्गांवर सुरू असलेली ही सेवा लगेचच बंद करता येणे शक्य नसल्याने एसटी आणि पीएमपी प्रशासन एकत्र नियोजन करून पहिल्या टप्प्यात 18 मार्ग बंद करणार आहे. त्यानुसार एसटी 18 मार्गांवर आपल्या गाड्या आणि फेऱ्या देखील वाढविणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *