सत्ता गेल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


तपास यंत्राण या केंद्र सरकाच्या पाळीव प्राण्याप्रमाणे काम करतात अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. या टीकेला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे .

उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर मैत्री केली, तेव्हापासून अशा विधाने हजारवेळा आली आहेत. त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचं याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. केवळ माध्यामात जागा मिळवण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत. सत्ता गेल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *