भारत सरकारच्या पंचायत राज्य मंत्रालयाच्या पायलेट योजनेत बेल्हे गावची निवड
रामदास सांगळे
विभागीय संपादक
०७ नोव्हेंबर २०२२
बेल्हे
भारतातील हायवे लगतचा ग्रामीण भागातील ३४ गावांचा विकास आराखडा तयार करून त्या गावांचा सर्वांगिक विकास करण्यासाठी भारत सरकारचा पंचायत राज्य मंत्रालयाचा वतीने पायलेट योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या मध्ये महाराष्ट्र राज्यातून बेल्हे (ता.जुन्नर) गावची निवड करण्यात आली आहे.
त्या कार्यशाळेला बेल्हे गावचे सरपंच गोरक्षनाथ वाघ व ग्रामपंचायत सदस्य राकेश डोळस उपस्थित होते. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे ३-४ नोव्हेंबर २०२२ कुषा भाऊ ठाकरे इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर स्वामित्व योजना और ग्रामीण नियोजन दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. बेल्हे ग्रामपंचायत सदस्य राकेश डोळस व बेल्हे गावचे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी बेल्हे गावच्या विविध विकास कामांची त्या ठिकाणी माहिती दिली. विकास आराखडा तयार केल्यामुळे गावासाठी शासनाचे येणारे विविध निधी व ग्रामनिधी तून गावची विकास कामे केली.