उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. काही लोक बांधावर जातात जाऊ द्या, मी सगळ्यांना कामाला लावलं असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्य सरकारने किती विकास कामे केली याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे.

आम्ही सत्तेत येण्यापूर्वी विकासाची गती मंदावली होती. सत्ता येताच विकासाला चालना दिली. तीन महिन्यांपूर्वी जनतेच्या मनातील सरकार आलं. आमचं सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले. सरकारकडून विकासाला गती देण्याचं काम झालं. गेल्या तीन महिन्यांमध्ये आम्ही अनेक मोठे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही शेतकरी हाच केंद्रबींदू माणून काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही नुकसानग्रस्तांना 6 हजार कोटींची मदत दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *