गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत; आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२


राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू, असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले आहे.

गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *