शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात हुकूमशाही रुजवू पाहत आहे का? – नाना पटोले
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. एवढंच नाहीतर माझी सुरक्षा कमी करण्यात आली असून माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
एका खासदाराच्या मनात याप्रकारची भीती निर्माण केली जातेय, तिथे सामान्यांची काय गत? शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात हुकूमशाही रुजवू पाहत आहे का?” असं नाना पटोले ट्वीटद्वारे म्हटले आहेत.