आतापर्यंत जे काही राजकराण झालं आहे त्याला पातळी होती; बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं टार्गेट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. घडयाळ बारामतीत बंद पाडले पाहिजे, कॉँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राचे पाणी आणून कशी विझवायची हेच आमचे टार्गेट आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून दूर गेले आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना बोलू दे, यातून त्यांची वृत्ती समोर येत आहे. सूडबुद्धीने काम सुरु असून द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना संपवण्याची अशी भाषा कोणीही वापरली नव्हती. आतापर्यंत जे काही राजकराण झालं आहे त्याला पातळी होती. पण गेल्या पाच सहा वर्षात रुपयाप्रमाणे ती पातळी घसरत चालली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *